सुप्रशासन

सुप्रशासन

जगभरातील प्रशासन पद्धतीचा अभ्यास करून सयाजीरावांनी सुप्रशासनाचे अनेक प्रयोग राबविले. गुड गव्हर्नन्स म्हणून त्यांच्या प्रयोगाकडे बघता येईल. ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीची पायाभरणी केली. जनतेला नागरी हक्क, सत्तेत सहभाग, अल्पसंख्याकांचे संरक्षण यावर भर दिला. ग्रामपंचायतीचा सदस्य साक्षर असावा, हा कायदा कारभारी सुजाण असावा, हे दाखवून देतो. लोकसेवकासाठी कर्तव्याची संहिता करून राज्यप्रशासनाचे प्रशिक्षण दिले. विधानसभेसारखी धारासभा स्थापून डॉ. भीमराव आंबेडकरांना सदस्य नेमले.