शेतकऱ्याचा मुलगा ते राजा

शेतकऱ्याचा मुलगा ते राजा

नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावचा अक्षरओळख नसलेला बारा वर्षांचा गोपाळ बडोदा राजगादीवर दत्तकपुत्र म्हणून योगायोगाने निवडला जातो. राज्याभिषेक होऊन सयाजीराव गायकवाड या नावाने पुढे ओळखला जातो. ‘मी राजा बनायला आलोय, हे सांगणारा हा मूळचा हुशार मुलगा सहा वर्षांत अक्षर व अंक ज्ञानासोबत लिहिणे, वाचने, प्रशासनाचे प्रशिक्षण घेऊन अठराव्या वर्षी कारभार पाहू लागतो. राजमाता जमनाबाई, दिवाण टी. माधवराव, केशवराव पंडित व भाऊ मास्तर हे देशी गुरुजन आणि आयसीएस असलेले इलियट या गुरुवर्यांनी या तरुण राजाला घडविले. शिक्षण हेच प्रगती-परिवर्तनाचा मार्ग आणि ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. ते प्रजेला द्यायचे हे सयाजीरावांनी ओळखले.